27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...
HomeRatnagiriउदय सामंत हे केवळ निरोद्योग मंत्री: विनायक राऊत

उदय सामंत हे केवळ निरोद्योग मंत्री: विनायक राऊत

सरकारने महानंदा प्रकल्पही गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट घाटला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत हे केवळ निरोद्योग मंत्री आहेत. राज्यातील प्रकल्प गुजरातला पाठवण्यापलिकडे त्यांनी काही केलेले नाही. हुजुरेगिरी करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत रत्नागिरी आणि सावंतवाडीतील आमदारांना महाविकास आघाडी घरी बसवल्याखेरीज राहणार नाही, असा ठाम विश्वास उबाठाचे उपनेते आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. रत्नागिरी दौऱ्यावर पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, ‘राज्याच्या उद्योगमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील जेके फाईस् प्रकल्प टिकवता आला नाही आणि पाणबुडी प्रकल्प आदित्य ठाकरेंमुळे गेला, असे म्हणत असतील तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. महाराष्ट्राचे भूषण म्हणून महानंदा प्रकल्पाकडे पाहिले जात.

आज या सरकारने महानंदा प्रकल्पही गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट घाटला आहे. महानंदा डेअरीपेक्षा त्याची मालमत्ता असलेल्या शेकडो एकर जागेवर डोळा असून, ती अमूलच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आघाडीने राज्यातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून येतील आणि विरोधकांचे दावे फोल ठरतील. आगामी विधानसभा निवडणुकीतही रत्नागिरी आणि सावंतवाडीतील आमदारांना घरी बसवून ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील, असे चित्र आहे. महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी गट, शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या उरावर बसून एकमेकाला संपवतील, असे भाकीतही विनायक राऊत यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular