29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunपरशुराम घाटातील वाहतुकीचा गुंता सुटला

परशुराम घाटातील वाहतुकीचा गुंता सुटला

परशुराम घाटातील बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या पायथ्याला फरशीतिठा येथे भुयारी मार्गासाठी भराव केल्याने सातत्याने वाहतूककोंडी होत होती; मात्र आता भुयारी मार्गावरून चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू झाल्याने येथील वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली आहे. मात्र, नव्या मार्गावर एसटी बसथांबा उपलब्ध नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. गेल्या काही वर्षांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम तापदायक ठरले. सतत दरडी कोसळण्याचा घटना व रस्त्यावर माती आल्याने बऱ्याचदा हे काम थांबवावे लागले होते.

काम सुरू असताना अपघातही घडले. मात्र, आता या सर्व अडचणींवर मात करत परशुराम घाटातील बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे. दोन्ही मार्गावरील काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आता डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. परशुराम घाटातील अतिशय धोकादायक टप्याच्या ठिकाणी हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याशिवाय घाटात मध्यवर्ती ठिकाणी काँक्रिटीकरणाचा काही भाग खचल्याने तो ब्रेकरने तोडून दुरुस्ती केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular