25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriमतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल

मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल

ठाकरे गटाने किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ झाला असतानाच, शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू उद्योजक किरण तथा भैय्या सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सकाळपासून दुपारपर्यंत किरण सामंत नॉट रिचेबल असल्याची चर्चा सर्वदूर सुरू होती. मतदान बुथवर देखील हाच विषय चर्चेचा बनला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली असून ठाकरे गटाने किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

मागील आठवड्यात किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयातील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेले बॅनर हटवल्यानेही त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली होती. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये किरण सामंत उदय सामंत यांच्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किरण सामंत यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते कुठे बाहेर गेले आहेत का किंवा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे का, असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.

इशारा समजून घ्यावा – दरम्यान, मतदानाच्यादिवशी किरण सामंत नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू होताच हाहा म्हणता हा विषय सोशल मीडियावर देखील गाजू लागला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या. खा. विनायक राऊत यांनी सांगितले की, किरण सामंत गप्प बसले आहेत याचा इशारा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावा. तर किरण सामंत यांना संरक्षण द्या, असं निवेदन पोलिसांना दिलंय, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. मतदारसंघात याआधी दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतर सुद्धा काही होऊ नये यासाठी पोलिसांनी किरण सामंतांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावे, अशी प्रतिक्रिया आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगितले की, किरण सामंत हे ग्रामीण भागात असल्याने त्यांचा फोन लागत नाही. लांजामधील दुर्गम भागात ते आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular