25 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeChiplunचाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

पुरेश्या रेल्वे गाड्या नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची गैरसोय होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर, मुंबई- गोवा महामार्गावर या गैरसोयीचा सामना दरवर्षी चाकरमानी करत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड ते मडुरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर छप्पर नसल्याने चाकरमानी प्रवाशांना ऊन-पावसाचा सामना करावा लागतो. तसेच रेल्वे उशीराने धावत असतात तेव्हा प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने कसरत करावी लागते. तसेच बाहेर विमानतळ लूक असलेले सुशोभीकरण आणि आत मध्ये गैरसोयीचे साम्राज्य आहे.

तसेच सावंतवाडी पर्यंत पुरेश्या रेल्वे गाड्या नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. रेल्वे गाड्यांना विलंब झाल्यास प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने चाकरम ान्यांना परतीच्या प्रवासात पाऊसात भिजत उभे राहत ट्रेनची प्रतिक्षा करावी लागत आहे. गणेशोत्सवात काळात कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, यंदा मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले आहेत, दिड, पाच, सात, नऊ, अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करून चाकरमानी आता परत आपल्या नोकरीच्या ठिकाणी जायला निघाले आहेत.

सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने भर उन्हा पावसात चाकरम ान्यांना उभे राहावे लागत आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे. स्थानकापासून मडुरा रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. त्यापैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या १.१ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम पहिल्या टप्प्यात होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular