29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...
HomeRajapurराजापुरातील “त्या” सलून व्यवसायिकाच्या खूनामागे चोरीचा उद्देश

राजापुरातील “त्या” सलून व्यवसायिकाच्या खूनामागे चोरीचा उद्देश

सदर प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सोमवारी पत्रकारांना माहिती दिली.

मागील आठवड्यात राजापूर शहरातील तरुण सलून व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण याचा झालेला खून हा चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलीस तपासात माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणी संशयीत रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी वय २५,  रा.उत्तरपदेश, सध्या राजापूर याच्या विरोधात दाखल गुन्ह्यात आता चोरीच्या ३९७ कलमाची वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे.

सदर प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सोमवारी पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  ९ मार्च रोजी  राजापूर शहरातील रानतळे येथील सड्यावर तरुण सलून व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण वय ४०,  रा. चव्हाणवाडी, राजापूर याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून येत होत्या आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून झाल्याचे उघड झाले.

या प्रकरणी तातडीने सूत्रे हलविण्यात आल्याने, राजापूर पोलिसांनी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला काही तासांमध्येच अटक केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती त्यावेळी पोलिसांनी दिली होती. त्यानुसार सुरुवातीला भारतीय दंड विधान कलम ३०२ व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी २०१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु अधिक तपास केला असता, पोलीस तपासात हा खून चोरीच्या हेतूने झाल्याचे पुढे आले आहे. आरोपीकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये आता ३९७ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ मार्चपर्यंत या प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular