29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeMaharashtraकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर उच्च न्यायालयाकडून दिलासा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर उच्च न्यायालयाकडून दिलासा

राज्याच्या महाअधिवक्त्यांनी मुंबई महानगरपालिकेने दिलेली नोटीस मागे घेण्यात येत असल्याच न्यायालयाला सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामा बद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राणे कुटुंबियाला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. राज्याच्या महाअधिवक्त्यांनी मुंबई महानगरपालिकेने दिलेली नोटीस मागे घेण्यात येत असल्याच न्यायालयाला सांगितलं आहे. त्यामुळे आता राणेंच्या बंगल्यावर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अधिश बंगल्याचे कोणतेही बांधकामाला आता पालिका प्रशासनाकडून हाथ लावण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.

नारायण राणेंना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांना हे बांधकाम हटवण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला जो उद्या संपणार होता. मुंबई महापालिकेने जुहू येथील अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेणारे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना एक प्रकारचा मोठा दिलासा मिळाला आहे. सुनावणी दरम्यान महापालिकेने केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांना मोठा दिलासा देणारी माहिती न्यायालयाला दिली असल्याने  सुनावणी दरम्यान राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार राणेंच्या त्या बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहेत.

पूर्वीच्या झालेल्या सुनावणीमध्ये एकीकडे याचिकेमध्ये काहीही बेकायदेशीर नाही, असा दावा असताना मग बांधकाम नियमित करण्याचा प्रश्नच कुठे येतो?  असा प्रश्न २२ मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान पालिकेने याचिकेसंदर्भात युक्तिवाद करताना उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही नोटीस मागे घेण्यात यावी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला पालिकेने महाधिवक्त्यांच्या माध्यमातून, “आम्ही ही नोटीस मागे घेत आहोत,” असं सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular