29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeKokanमहाराष्ट्रात पुन्हा उष्म्याची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा उष्म्याची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा

कोकण किनारपट्टी भागात बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा विरळ झाल्यानंतर मंदावलेल्या वार्‍याच्या वेगाने उष्णतेच्या तीव्र लहरींनी कोकण व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे मार्च अखेरसह एप्रिल महिन्याचा उकाडा असह्य होण्याच्या मार्गावर आहे. या कालावधीत वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागात बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे गेल्या आठवड्यात असलेले मळब दुसर्या दिवशी दूर झाले असून आगामी तीन दिवस तापमानात वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्यात दिनांक २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने इशारा दिला असून,  उष्माघाताचा धोका असल्याचे देखील कळवले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी महत्वाची सूचना राज्यस्तरावरुन देण्यात आली आहे.

तहान लागली नसल्यास देखील पाणी जरूर प्यावे. दुपारी १२.३० ते ३.३० पर्यंत उन्हात फिरू नये. बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बाटली सोबत असावी. उघड्या डोक्याने फिरू नये. उष्णतेची तीव्रता एवढी अधिक आहे कि, चक्कर येण्याची शक्यता आहे. योग्य प्रमाणात ताक,दही, लिंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत, उसाचा रस अशी शीत पेय प्यावीत. भर उन्हात श्रमाची कामे करू नये. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी. व शक्यतो कामा शिवाय घराबाहेर पडू नये अशा सुचना रत्नागिरी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular