26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunखोके सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे ? युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

खोके सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे ? युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा जिंकणे गरजेचे आहे.

राज्यातील खोके सरकार हे महाराष्ट्राचे की, गुजरातचे आहे हे कळेनासे झाले आहे. ज्याप्रमाणे गद्दार सुरतमार्गे जाऊन आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. येत्या डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन हे या खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असून, हे ४० गद्दार पुन्हा विधानसभेत दिसणार नसल्याचा घणाघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. खेड येथील माजी आमदार संजय कदम यांच्या घराजवळील अंगणात आयोजित केलेल्या खळा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘शिवसेना हा एक परिवार आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधावा म्हणून ही बैठक आहे.

राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. चिपी विमानतळ सुरू करण्यापासून अनेक मंदिरांना फंड देणे असेल, ही कामे थांबली आहेत. प्रत्येक क्षेत्रात हे सरकारें अपयशी ठरले आहे. कृषिक्षेत्र तर पूर्ण कोलमडलेले आहे. हे वातावरण जर बदलायचे असेल तर याला एकच पर्याय आहे. निवडणूक जिंकण्याशिवाय पर्याय नाही. ३१ डिसेंबरच्या आधी कोटनि निर्णय देणे गरजेचे आहे. हे ४० गद्दार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा जिंकणे गरजेचे आहे. मुंबईने साथ दिली आहे.

मागील कोकण पदवीधर निवडणुकीत आपली तयारी कमी पडली होती; पण आता संधी आली आहे. या निवडणुकीत देशातील कुठलाही पदवीधर नावनोंदणी करू शकतो. त्यामुळे नावनोंदणी करून आघाडीला मतदान करून सरकार पाडा.’ यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, माजी आमदार संजय कदम, माजी खासदार अनंत गीते, युवासेना सचिव वरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular