28 C
Ratnagiri
Wednesday, April 17, 2024

आनंदाची बातमी! यंदा पाऊस १०६ टक्के बरसणार

एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून...

कोरे प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यांत...

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून थेट गुन्हाच दाखल

खेड शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे....
HomeRatnagiriइंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या अक्षय पडवळचे धमनी स्थानकात जंगी स्वागत

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या अक्षय पडवळचे धमनी स्थानकात जंगी स्वागत

कोळंबे ग्रामस्थांनी आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अक्षयचा सत्कार करण्याचे ठरवले

संगमेश्वर कोळंबे येथील अक्षय पडवळची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोळंबे ग्रामस्थांनी आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अक्षयचा सत्कार करण्याचे ठरवले आणि धामणी रेल्वे स्थानक ते कोळंबे अशी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले. त्यानुसार रेल्वे स्थानकावर सर्व ग्रामस्थ त्याची वाट पहात होते. अक्षयने मुंबई ते गोवा हे ५६७ किमीच अंतर ४० तास १४ मिनिट एवढ्या विक्रमी वेळात पार पाडल्याने हा रेकोर्ड बनला आहे.

धामणी रेल्वे स्थानकावर अक्षय दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उतरल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. सर्वप्रथम गावातील महिलांनी त्याचे औक्षण केले. त्याला पेढा भरवून त्याच सर्वांनी कौतुक केलं. त्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात त्याचे पारंपारिक रित्या स्वागत झाले. हार, तुरे, पुष्पगुच्छ, नारळ देऊन अनेकजण त्याचा सत्कार करण्यासाठी पुढे सरसावत होते. अनेकांनी त्याच्या सोबत सेल्फी देखील काढल्या.

एखाद्या सेलिब्रिटीच रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यावर जशी त्याला पाहण्यासाठी गर्दी होते तशीच काहीशी परिस्थिती भासत होती. अक्षयला पेढा भरवून आई-वडिलांनी कौतुक केले. संगमेश्वर पोलीस स्थानकाचे सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर कोळंबे गावचे समाजसेवक अतिष पाटणे, सरपंच पडवळ, नथुराम पडवळ,संतोष चव्हाण गुरूजी, दत्तात्रय खातू, नारायण चव्हाण, जगन्नाथ मुळ्ये, प्रशांत मुळ्ये, रामचंद्र पडवळ, चंद्रकांत भरणकर उपसरपंच, वडील परशुराम पडवळ, आई प्रतिज्ञा पडवळ, स्नेहल बहीण, रोशन करंडे, माजी पंचायत समिती सदस्या वेदांती अतिश पाटणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले.

कोळंबे येथे आल्यानंतर प्रथम ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन अक्षयची वाजत गाजत मिरवणूक गावाच्या दिशेने निघाली. यावेळी अनेकांनी त्याचे कौतुक केले. निवृत्त शिक्षक खातू म्हणाले की, कोळंबी गावच्या सुपुत्राने आपल्या गावाच नाव मोठे केले आहे. अतिशय गरीब परिस्थितीत कोळंबेच्या एसकेपीएम हायस्कुलमध्ये शिक्षण घेऊन मुंबईला जाऊन मोठं यश मिळवलं आहे. आर्मीमध्ये भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन देशाचे भावी सैनिक घडवण्याचं काम तो करत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. अक्षय देखील त्यावेळी म्हणाला कि, गावातील गोरगरीब मुलांना पोलीस भरती,  सैनिक भरतीसाठी सर्वप्रकारचे मार्गदर्शन आपल्याकडून केले जाईल असे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular