19.6 C
Ratnagiri
Sunday, November 16, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriइज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची, शिंदेंचा टोला

इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची, शिंदेंचा टोला

मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महाम ार्ग हा कोकणासाठी गेमचेंजर ठरेल.

ना. एकनाथ शिंदे हे गुरूवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. विकासकामांची उ‌द्घाटने आणि आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला सार्गदर्शन केले. मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती.

शिवसेनेचे वैभव – यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेमध्ये सर्व माजी आमदार व्यासपिठावर आहेत, हे शिवसेनेचे वैभव आहे, तर समोर बसलेले कार्यकर्ते हे आमचे ऐश्वर्य आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.

कोकण हा शिवसेनेचा श्वास – कोकणातील शिवसैनिकांनी बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर अपार प्रेम केले. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे, तर शिवसेना कोकणी म ाणसाचा विश्वास आहे. १९९५ पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि पुढील ५६ वर्ष तो तसाच फडकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खरी शिवसेना धनुष्यबाणाचीच – ना. एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत आमची निशाणी धनुष्यबाण होती, आणि आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तीच राहणार आहे. विरोधकांना प्रश्न पडतोय. खरी शिवसेना कोणाची? काळजी करू नका, धनुष्यबाण एवढ्या वेगाने चालेल की विरोधकांची पळता भुई थोडी होईल, असा टोला कुणाचेही नाव न घेता त्यांनी लगावला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत – पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना ना. एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. हे अभिवचन दिले होते त्यानुसार ३२ हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे नेहमीच आपत्तीच्या काळात आघाडीवर राहिले आहेत. माझे हात देणारे आहेत, घेणारे नाहीत, असे शिंदे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १८०० कोटींच्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी झाली असून सिंधुदुर्गलाही यापुढे भरीव निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘लाडकी बहीण’ – ना. एकनाथ शिंदे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण, लेक लाडकी, लखपती दिदी, एसटीमध्ये महिलांना ५०% सवलत, शेतकरी सन्मान, वयोश्री अशा अनेक योजना आम्ही राबवल्या आहेत. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ‘शासन आपल्या दारी’ मोहीम राबवली आणि त्याचा ५ कोटी जनतेला फायदा झाला.

जिंकल्यावर ईव्हीएम चांगले – विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले, लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून त्यांनी काही जागा जिंकल्या, पण विधानसभेत त्यांना जनतेने नाकारले. ते आता निवडणूक आयोगाकडे धावत आहेत. जिंकल्यावर ईव्हीएम चांगले आणि हरल्यानंतर खराब असते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विरोधक पराभवाच्या भीतीने रडीचा डाव खेळत आहेत. पण शिवसैनिक रडत नाही, तो लढतो. आम्ही जनतेच्या मनातील सरकार आहोत आणि आता दुसरी इनिंग सुरू झाली आहे.

कोकणसाठी गेमचेंजर – मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महाम ार्ग हा कोकणासाठी गेमचेंजर ठरेल. या मार्गामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित आहोत. विरोधक प्रॉपर्टीचे वारस असतील, पण आम्ही भगव्याच्या विचारांचे वारस आहोत. भगव्याचा अपमान सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

कार्यकर्त्यांचा संकल्प – घराघरांमध्ये शिवसेना पोहोचवा, महायुतीच्या योजना जनतेपर्यंत न्या, येणारी कोणतीही निवडणूक आपण जिंकायचीच. भगवा फडकवण्याची, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची आणि कोकणचा कायापालट करण्याची शपथ घेऊया, असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्यांना केले. या मेळाव्याला उद्योगमंत्री ना. उदय सामंत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आ. दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, आ. किरण सामंत, आ. निलेश राणे, रवींद्र फाटक, राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजश्री अहिरराव, अण्णा कदम आदींसह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular