26.6 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

TVS Raider आणि Hero Xtreme-125R सोबत स्पर्धा

Bajaj Pulsar N125 भारतात लॉन्च होण्यापूर्वीच समोर...

भारताची ४६ धावांत दाणादाण, प्रथम फलंदाजीचा निर्णय अंगलट

या अगोदरच्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत षटकामागे ८.२२ च्या...

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ज्येष्ठ बंगाली अभिनेते आणि लोकप्रिय वाचक देवराज...
HomeDapoliहर्णे बंदरातील उलाढाल थांबली, कोट्यावधींचे नुकसान

हर्णे बंदरातील उलाढाल थांबली, कोट्यावधींचे नुकसान

मासेमारी आता चालू व्हायला अजूनही तीन ते चार दिवस लागतील.

गणेशोत्सव आणि अचानक बदललेल्या वातावरणामुळे हर्णे बंदरातील मासेमारी उद्योगाला ब्रेकच लागला आहे. दोन दिवसांपूर्वी काही मच्छीमारांनी आपल्या नौका मासेमारीसाठी समुद्रामध्ये लोटल्या आहेत; परंतु अचानक या परतीच्या पावसाने वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांनी मासेमारीला थांबविले. यामुळे आता बंदर गजबजायला अजून एक आठवडा जाण्याची शक्यता आहे. किमान तीन आठवडे बंद मासेमारी व्यवसायामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्टपासून चालू झालेल्या मासेमारी उद्योगाला चांगल्या प्रकारे सुरुवात ५ ते ६ ऑगस्टपासून झाली होती.

मासळी बंपर मिळू लागली होती; परंतु बहुतांशी मासळीचे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ५० टक्केने दर घसरले होते. तरीही किमान ३०० ते ४०० नौका या वेळी मासेमारीला उतरल्या होत्या. किमान दोन आठवडे चांगले गेले आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा वादळाने तोंड वर काढले त्यामध्ये किमान ८ ते १० दिवस मासेमारी थांबली होती. पुन्हा वातावरण शांत झाल्यानंतर मासेमारीला सुरवात झाली ती ६ सप्टेंबरपासून थांबली. गणेशोत्सवामुळे मासेमारी उद्योगच बंद होता. अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीला सुरुवात होणार होती; परंतु गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर केला आहे तसेच ३५ ते ४० किमी वेगाने वारे देखील वाहत आहेत.

अशी ही परिस्थिती किमान अजून दोन दिवस असण्याची शक्यता आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. वातावरण शांत झाल्याशिवाय मासेमारीला नौका जाणार नाहीत. अजूनही दोन ते तीन दिवस तरी मच्छीमारांना शांतच बसावे लागणार आहे, म्हणजे हा महिना मासेमारीविनाच जाणार आहे. हर्णै मासेमारी उद्योग बंदमुळे रोजची मासळी विक्रीतून होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे. गणेशोत्सवासाठी खलाशी सुटी घेतात; परंतु उत्सव संपल्यावर मासेमारी लगेचच चालू होणार होती.

अचानक आलेल्या या वादळसदृश परिस्थितीने तोंडचे पाणी पळाले आहे. मच्छीमार मासेमारीला गेले असते तर या बंदर मासळीच्या लिलावाने गजबजायला सुरुवात झाली असती, असा बेत येथील नौकामालकांचा होता. वादळामुळे थांबलेली मासेमारी आता चालू व्हायला अजूनही तीन ते चार दिवस लागतील. गणेशोत्सवानंतर सुमारे १०० नौका मासेमारीला समुद्रात उतरल्या आहेत. काही नौकांची तयारी सुरू होती, तर काही नौकांचे नाखवा खलाशांच्या शोधात आहेत तर काहींकडे सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने समुद्रामध्ये मासेमारीला उतरायचे थांबले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular