28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgशेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून दिलाशाची आशा

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून दिलाशाची आशा

वर्षभराच पिक हाती आले असतानांच अचानक परतीच्या पावसाने घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पिकाची वाताहात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

कोकणात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेली पिके कुजून खराब झाल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्थानिक सर्व पक्षाचे आमदार खासदार करताना दिसत आहेत. वर्षभराच पिक हाती आले असतानांच अचानक परतीच्या पावसाने घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पिकाची वाताहात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

रत्नागिरी सह सिंधुदुर्गामध्ये देखील पावसाने शेतकर्यांचे तीन तेरा वाजवले आहेत. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेमळे गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीबाबतचा अहवाल कंपनीला सादर केला. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असताना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

भात कापणीला आलेले असताना गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेमळे गावात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐनभरात आलेली उभी भातशेती पावसामुळे शेतात आडवी झाली असून, ओलसर लोंब्याना कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी भात पाण्याखाली गेल्याने रोपे कुजलेल्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर नेमळेतील काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये सहभागी होऊन पीकविमा भरला होता.

परतीच्या पावसामुळे गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली. त्यानुसार विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येत विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाची पाहणी करून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवून दिला. यावेळी नेमळे गावातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular