रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून रत्नागिरीमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे, अशी सकारात्मक चर्चा ऐकिवात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रत्नागिरी जिल्ह्याची स्थिती अतिशय भयावह झाली होती, परंतु आत्ता जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागण्याची चिन्हे दिसू लागले आहेत, त्याच प्रमाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १४.३४ टक्क्यांवरून घसरून ३.४१ टक्क्यांवर आला आहे.
कोरोनाची आधीच्या महिन्यांतील बाधितांची संख्या जी कायम ५०० च्या दरम्यान असायची, ती आता कमी होऊन साधारण दीडशेच्या दरम्यान कमी आली आहे. कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थिती खूपच गंभीर होती, कारण त्या वेळेला लसीकरण किंवा इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हते. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने, मृत्यूच्या प्रमाणात घट होऊ लागली. रत्नागिरीमध्ये देखील कोरोना निर्बंधित लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये घट होऊ लागली त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी असलेले कडक निर्बंध शिथिल होऊन प्रथम चौथ्या टप्प्यात आणि नंतर नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये रत्नागिरी अनलॉक करण्यात आली.
रत्नागिरीमध्ये दुसरी लाट सुरू असताना संगमेश्वर मध्ये तिसरा व्हेरिअंट डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळल्याची वृत्त प्रसिद्ध झाले होते, परंतु प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या सतर्कमुळे वेळीच त्याला रोखता आले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण संख्या जास्त आढळत असल्याने ग्रामीण भागांमध्ये सक्तीचे लसीकरण मोहीम आणि तपासणी मोहीम राबवायला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. जिल्हाधिकार्यांनी जिथे जास्त बाधित संख्या आहे, त्या क्षेत्रांना उद्रेकजनक म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला, अखेर जिल्ह्यामध्ये चाचणी आणि लसीकरण वाढवल्याने कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे.