वन विभागाच्या कुर्णे येथील राखीव क्षेत्रातून सागाच्या झाडांची चोरी करून त्यांची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी वन विभागाने राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील एकूण ७ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ३ लाख १४ हजार ७९० रुपयांचा मुद्देम ाल देखील वन विभागाने, जप्त केला असून त्यासाठी वापरण्यात आलेली क्रेनदेखील जप्त करण्यात आल्याने जप्त केलेल्या एकूण ऐवजाची किंमत २५ लाखांहून अधिक झाली आहे. याबाबत पत्रकारांना कारवाई करणाऱ्या पथकाने दिलेल्या अधिवक माहितीनुसार, लांजा तालुक्यातील कुर्णे येथे वन विभागाचे राखीव क्षेत्र आहे. दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी जंगल फिरती करत असताना लांजा वनपाल सारीक फकीर आणि वनरक्षक यांना या राखीव क्षेत्रातून साग जातीची एकूण ७झाडे चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली होती. या ७ झाडांपैकी काही मुद्देमाल हा त्याच ठिकाणी आढळून आला होता. तर काही माल लंपास केला असल्याचे दिसून आले. या चोरी प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्यांवर दि. ३० ऑगस्ट रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) फ प्रमाणे पुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वन विभागाकडून या चोरीचा तपास लावण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली होती.
७ संशयितांना पकडले – या तपासाअंती पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून (१) मनोज संजय पाटणकर (२) मंदार संजय पाटणकर (३) अजय नागूप्रसाद निषाद (४) शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर (५) विजयकुमार रामशंकर निषाद (६) मंदार मनमोहन बारस्कर (७) शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे, ता. राजापूर) या ७ जणांना पकडण्यात आल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. त्यांची अधिक चौकशी केली असतां सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा रातोरात क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरुन कुर्णे ते कुंभवडे अशी वाहतूक करुन तो उतरवण्यात आला. त्यानंतर तो मुद्देमाल परत क्रेनच्या साहाय्याने दुसऱ्या ट्रकमध्ये भरून माडबनकडे जाणाऱ्या कसबा मिठगवाणे पिकपशेडपासुन साधारणपणे ४०० मीटर अंतरावर (स्थानिक नाव पठार) येथे लपवून ठेवला असंल्याचे संशयित आरोपी मनोज संजय पाटणकर याने सांगितले..
३ लाखांचे खैर जप्त – त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर जावून सदर गुन्ह्यामधील मुद्देमाल एकूण साग नग ३१/७.४९५ घनमीटर इतका असून त्याची बाजार भावाने अंदाजे किंमत ३ लाख १४ हजार ७९० इतका माल वनाधिकारी राजापूर यांनी ताब्यात घेतला आहे. सदरचा साग माल हा वनरक्षक लांजा यांच्याकडे सुरक्षेच्या कारणास्तव ताबा पावतीने ताब्यात देण्यात आलेला आहे. तर या गुन्ह्यात वापरलेली क्रेनही जप्त करण्यात आली आहे. क्रेन आणि सागासह ताब्यात घेतलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २५ लाखांपेक्षा अधिक होते. सदर वन गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणारी वाहने व इतर साधन सामग्री इत्यादी बाबींचा तपास चालू आहे.
वनविभागाची कारवाई – सदर गुन्हेकामी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर श्री. गुरुप्रसाद, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीम, प्रियंका लगड चिपळूण रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनखाली कारवाई केली जात असून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र वनाधिकारी फिरते पथक रत्नागिरी जितेंद्र गुजले, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनपाल लांजा सारीक फकीर, वनपाल पाली न्हानू गावडे, वनपाल देवरुख सागर गोसावी, वनपाल जी. एम. पाटील, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक लांजा श्रीम. नमिता कांबळे, वनरक्षक कोर्ले श्रीम. श्रावणी पवार, वनरक्षक विशाल पाटील, वनरक्षक सूरज तेली, वनरक्षक आकाश कुडकर, वनरक्षक जालने मेजर, वनरक्षक श्री. साबणे, वनरक्षक श्रीम. सुप्रिया काळे आदि उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रम ांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्यावतीने श्रीम. गिरिजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.