27.3 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeSindhudurgवेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई, लाखो रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त

वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई, लाखो रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त

वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या गोवा बनावटी दारूची विक्री आणि वाहतूक होते हे ताज प्रकरण समोर आले आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील घोडेमुख देवस्थानसमोरील, मळेवाड ते सावंतवाडी जाणारे रोडवर आज १५ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून मारूती सुझूकी कंपनीची स्वीप्ट कार मधून नेण्यात येणारे गोवा बनावटी दारूचे ५४ बॉक्स पकडले. वेंगुर्ले पोलिस कोल्हापूर मधील दारू साठा हस्तगत करण्याच्या घटनेने प्रेरित झाले असून, त्यांनी आज पहाटे पेट्रोलिंग दरम्यान घोडेमुख येथे गोवा बनावटी दारूसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

यातील गाडी चालक सावंतवाडी तालुक्यातील किनळे खालचीवाडी येथील तुकाराम न्हानू नाईक यांच्यासह गाडी व दारुसह सुमारे ५ लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आणि वेंगुर्ले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई),८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल अमर विष्णु कांडर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तुकाराम उर्फ आजो न्हानू नाईक हा आपल्या ताब्यातील मारूती सुझूकी कंपनीची स्वीप्ट चारचाकी गाडी नं GA ०७ C २६५५ मधून वरील किंमतीची गोवा बनावटीची दारू घेऊन जात होता. पेट्रोलिंग दरम्यान घोडेमुख मंदिर समोर रस्त्यावर त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटी दारूचे बॉक्स आढळले. त्यामुळे त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.

दरम्यान वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या गोवा बनावटी दारूची विक्री आणि वाहतूक होते हे ताज प्रकरण समोर आले आहे. दोन दिवसात तब्बल २५ लाखाचा गोवा बनावट दारूचा साठा आढळून आला. त्यामुळे याविरोधात आता वेंगुर्लेचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याच प्रमाणे शहरात पाळमूळ पसरवू लागलेल्या अमली पदार्थाच्या विरोधातही आत्ताच कडक मोहीम राबवावी अशीही मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular