28.5 C
Ratnagiri
Tuesday, February 17, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeChiplunजिल्हात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू…

जिल्हात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू…

हल्ला गव्याने केला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील गुढे येथे एकाचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साडेअकराच्या सुमारास गुढे मोरेवाडी येथे घडली. हा हल्ला गव्याने केला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र वन विभागाने शवविचेछदन अहवालानंतर हल्ला कोणी केला हे समजू शकेल असे स्पष्ट केले. रवींद्र पाडुरंग आग्रे (वय ५५, गुढे जोगळेवाडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आग्रे दुचाकीवरून गुढे मोरेवाडी येथून मार्गताम्हाणे येथे निघाले होते. त्याच वेळी त्यांच्यावर जंगली प्राण्याने हल्ल केला असावा, असा अंदाज आहे. आग्रे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते रक्तस्त्राव झाल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती. या मार्गावरून निघालेल्या काही लोकांनी आग्रे यांना रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रान हलविले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळता गुढेतील ग्रामस्थ रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले.

वन विभागालाही याची माहिती देण्यात आली. सावर्डे व चिपळूण वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गुढे येथे दुपारी भरपूर पाऊस असल्याने वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा शोधताना अडचणी येत होत्या. काही लोकांनी बिबट्याने केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. काहींनी गव्याने हल्ला केल्याचे सांगितले. त्यामुळे नेमका हल्ला कोणी केला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र त्यांच्या शरीरावरील जखमांवरून हा हल्ला जंगली वन्य प्राण्यांनी केला असावा असे वन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रात्री कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते. शवविचेछदन अहवालानंतर हल्ला कोणी केला त्याचा उलघडा होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रवींद्र आग्रे यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular