30.3 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गणपती स्पेशल गाड्यांची तिकीटे काही मिनिटांत कशी संपतात, तिकीट बुकिंगमधील  घोटाळा आला समोर

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या बहुतांश चाकरमान्यांना रेल्वेची...

२०१९ च्या मंत्रीमंडळात मला घ्यायला हवं होतं ! आ. भास्करशेठ जाधव

२०१९ च्या मंत्रीमंडळात मला घ्यायला हवं होतं,...

सारखाप्यात विजेच्या धक्क्याने वृद्धा ठार, नातू जखमी

साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या...
HomeRatnagiri४० हजार मीटर फॉल्टी असल्याचा महावितरणचा दावा

४० हजार मीटर फॉल्टी असल्याचा महावितरणचा दावा

डिस्प्ले गेल्यामुळे रिडिंग घेता येत नाही.

महावितरण कंपनीच्या स्मार्ट अर्थात टीओडी (टाईन ऑफ डे) मीटरची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील फॉल्टी मीटरचा विषय पुढे आला आहे. महावितरण कंपनीने केलेल्या सव्र्व्हेमध्ये ४० हजार मीटर फॉल्टी (दोष असलेले) आढळले आहेत. ‘हे सर्व मीटर बदलुन तिथे नवीन टीओडी मीटर बसविण्यात येणार आहेत. परंतु हे मीटर सध्यातरी पोस्ट पेड़ किंवा प्रिपेड नाहीत. नियमित म ीटरप्रमाणे यांना वीज बिल येणार आहे. ग्राहकांकडून मात्र या ‘नव्या मीटरला विरोध होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अदानी कंपनीच्या माध्यमातून १२ हजार ५२८ मीटर बसविण्यात आले आहेत. महावितरणची १०० टक्के वीज बिल वसूली व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महावितरण कंपनीने जिल्ह्यातील सर्व प्रकारचे ६ लाख ग्राहक आहेत. त्यापैंकी अनेक ग्राहकांच्या म ीटरमध्ये दोष, आहे. डिस्प्ले गेल्यामुळे रिडिंग घेता येत नाही. ग्राहक विजेचा वापर करत आहे. परंतु रिडिंग मिळत नसल्याने त्याचा तोटा महावितरण कंपनीला सोसावा लागत आहे, असे महवितरणचे म्हणणे आहे.

४० हजार मीटर फॉल्टी – कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये जिल्ह्यात अशा प्रकारे ४० हजार मीटरफॉल्टी असल्याचे उघड झाले. महावितरण कंपनीने ही मीटर बदलण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांनी मान्यता प्राप्त कंपन्यांकडुन मीटर घेऊन बसविण्याचा ठेका घेतला आहे. झोननिहाय याचा ठेका देण्यात आला आहे. मीटर वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. परंतु ते बसविण्याचा कोकण झोनचा ठेका अदानी कंपनीला मि ळाला आहे.

टीओडी मीटर – जिल्ह्यात टाई ऑफ डे (टीओडी) मीटर बसविण्यास दोन ते तीन महिन्यांपूर्वीच सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्रातील ३३० फिडरपैकी २५९ फिडरवर बसविण्यात आले आहेत. ८ हजार ८६५ पैकी १ हजार ६५१ ट्रान्सफॉर्मरवर मीटर बसवले. १२ हजार २४५ शासकीय ग्राहकांपैकी ४ हजार २०५ ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले आहेत. ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे. महावितरण कंपनीकडुन हे मीटर मोफत देण्यात येणार आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

महावितरणचा असा आहे प्रस्ताव – जिल्ह्यात बसविण्यात येणारी हे टीओडी (टाईन ऑफ डे) मीटर आहेत. विशेष म्हणजे विजेच्या कमी वापरावेळी जास्त वीज वापरली तर या युनिटमध्ये सवलत दिली जाणार आहे. तर विजेचा जास्त वापर होत असताना वीजही जास्त प्रमाणात वापरली तर त्यावर जास्त आकारणी केली जाणार आहे. परंतु सध्या तरी हे मीटर बसविणाऱ्या ग्राहकांना सवलत देण्याच्यादृष्टीने प्रयत्न आहेत. तसा प्रस्ताव कंपनीने वरिष्ठांना दिला आहे..

RELATED ARTICLES

Most Popular